Monday, January 27, 2014

प्रश्न

लिहायच खूपे पण शब्द सुचत नाहीये
रडावसं वाटतय पण आसू आटलेत
दूर निघालोय पण वाट हरपली आहे
आयुष्य उरलाय निस्तेज फुलांसारख,,
चुरगळून टाकण्यासारख... 

रसिका तुझ्याचसाठी

स्वीकार हि कविता !!!!!!!!
देवास वंदुनिया मैफिल सुरु होई 
दुर्भाग्य हेचि माझे येउन रिक्त जाई 

व्हावी सदाच धुंद मैफिल हि सुखाची 
घ्यावी शुभेच्छा मात्र एका कवी मनाची

दुग्धात शर्करा ती गोडी अवीट यावी 
हि रात्र रसिकांच्या स्मरणी सदा असावी

हि रात्र चांदण्यांची नाही मला प्रीतीची 
जावेच लागते ना? हि बंधने जगाची ....

सारी सुखात जावी हि रात्र चांदण्यांची 
स्वीकार हि कविता ! रसिका हि तुझ्याचसाठी 

वाट

ढग थांबले माझे तुझी वाट पाहताना !
पाऊसरुपी अश्रू कोसळले तू जवळ नसताना !
का भेटली तू मजला, आयुष्य माझे संपवताना !
दिलास शब्द तू तुझा ,परत मागे फिरताना !
सांभाळले मनाला मी , तू जवळ नसताना !
ढळले अश्रू माझे तुझ्याच आठवणीत रडताना !

पांडुरंग

भक्त आले दर्शनाला पांडुरंगाच्या दरबारी
विटेवरी उभा आता हात ठेउनिया कटेवरी !

पाहुनी सावळे हे रूप झाले भक्तीत सारे दंग
आता गातो फक्त आम्ही संत तुकाचे अभंग !

गेले सर्व भक्त जन नामस्मरणात बुडून
माय चंद्रभागा आता वाहते भरून ।

उत्कंठा भेटीची जास्त ताणू नका देवा
दर्शन द्यावे भक्तांना हेच मागणे आता !

ताई..

ताई..
तुझ्या विदेशी जाण्याने आता खरच 'ताई' यात किती शक्ती आहे हे कळतय… 
 
तुझा मारणं आता पुन्हा अनुभवायचय 
मला तू मारल्यावर पुन्हा खोट खोट रडायचंय
कधी असच तुझ रुसणं मला पुन्हा बघायचंय 
आपल्यात झालेली भांडण मिटवताना,
मला आता खरच माघार घ्यायची आहे 
मला हे सगळा पुन्हा करायचंय ……। 
ये ना ,,,ताई तू ये ना परत 
Miss you !!!

चिन्मय संत